शिवराज्याभिषेक सोहळा तिथीनुसारच व्हावा   

कोल्हापूर : रायगडावर दरवर्षी ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची पद्धत बंद करून हा सोहळा तिथीनुसार साजरा करावा, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. या विधानावरून भिडे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना भिडे म्हणाले, स्वातंत्र मिळून ७६ वर्षे झाली तरीसुद्धा आपण आपले मानसिक अधिष्ठान हे ब्रिटिशांच्या अधीन ठेवलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीप्रमाणेच झाला होता. त्यामुळे त्याचा स्मरणदिन हा तिथीप्रमाणेच व्हायला पाहिजे. सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची पद्धत नामशेष केली पाहिजे. तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा व्हायला हवा.
 
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबद्दल ते म्हणाले, या कुत्र्याला काही ऐतिहासिक आघार नाही, असे इतिहास संशोधक म्हणत आहेत. मात्र हे इतिहास संशोधक काय उंचीचे आणि किती कुवतीचे आहेत, हे पाहिले पाहिजे. त्यामुळे वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये. तो राजकारणाचा विषय बनवू नये. 

Related Articles